हे वाचा मग वरुणविषयी बोला

“महात्मा गांधींपेक्षा बदफैली आणि फाटका मुसलमान मला अधिक प्रिय आहे”, असे मौलाना मुहमद अली म्हणाले. त्यांचे स्मारक म्हणून मुंबईतील एका मोठ्या रस्त्याला मुहमद अलींचे नाव देण्यात आले आहे. अस्पृश्यांचे दोन समान भाग करून ते हिंदु आणि मुसलमानांनी आपापसांत वाटून घ्यावेत, अशी सूचना याच मौलानांनी केली होती. हिंदु आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्रे असून त्यांचे सहजीवन अशक्य आहे, असे म्हणणार्‍या सर सय्यद अहमद यांची जन्मशताब्दी भारत सरकारने धुमधडाक्यात साजरी केली.

जे हिंदूंना अमृत ते मुसलमानांना विष वाटले पाहिजे, असा मुस्लीम लीगचा १९१० चा ठराव आहे. त्या मुस्लीम लीगचा सदस्य केरळचे अहमद आज मनमोहनसिंग मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री आहेत. `मुसलमान मुलीवर हिंदू मुलगा प्रेम करतो, हे पडद्यावरही आम्ही सहन करणार नाही’, असे सनदी अधिकारी आणि खासदार सय्यद शहाबुद्दीन म्हणाले. त्यांना एका शब्दाने कोणी काही विचारले नाही. हिंदी चित्रपटातील जुना विनोदी नट मेहमूद याला चित्रीकरण चालू असता लघुशंकेस जायचे असले, तर तो करंगळी वर करून `मी जरा हिंदुस्थानला जाऊन येतो’, असे म्हणत असे आणि उपस्थित सर्व नटनट्या फिदीफिदी हसून त्याच्या विनोदाला दाद देत. प्रसाधनगृहाला हिंदुस्थान म्हटले म्हणून कोणी त्याच्या कानाखाली आवाज काढला नाही. “या देशाला मातृभूमी मानायला आणि हिंदूंना बंधू म्हणायला मुसलमानांना इस्लामची अनुमती कधीही मिळणार नाही”, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले. त्यानंतर ते घटनाकार झाले. “भारतावर परकीयांचे आक्रमण होईल आणि आक्रमक इस्लामधर्मीय असेल, तर भारतातील मुसलमान कोणती भूमिका घेतील याविषयी मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही”, असे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर म्हणाले. त्यांचे गीत राष्ट्रगीत झाले. “हिंदूंचा मुसलमान होतो तेव्हा हिंदूंची संख्या एकाने कमी होते, असे नसून शत्रूची संख्या एकाने वाढते”, असे स्वामी विवेकानंद म्हणाले. त्यांचे सुंदर स्मारक कन्याकुमारीला आहे. “या देशाची संस्कृती हिंदु आहे, हे मान्य न करता ती संमिश्र आहे, असे म्हणणे `बास्टर्ड’पणाचे लक्षण आहे”, असे योगी अरविंद म्हणाले. “मुसलमान चांगला नागरिक होऊ शकणार नाही”, असे अँनी बेझंट यांचे मत होते. त्यामानाने “हिंदूंवर अत्याचार करणारे हात मी तोडून टाकीन” या वरुण गांधींच्या मुळीच प्रक्षोभक नसलेल्या विधानावर रण माजविण्यापेक्षा मुसलमानांशी शांततापूर्ण आणि सन्मानपूर्ण सहजीवन गांधीवादाने शक्य होईल कि आणखी कशाने याचा विचार सर्व हिंदूंनी करायला हवा.
- सुघोष

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.